जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रा महोत्सव २०२६ ची सांगता शिव पार्वती विवाहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.दिनांक २३ जानेवारी पासून श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. यात्रा महोत्सवाचा आखरी दिवस म्हणजे महाशिवरात्री.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्रीहरी बालाजी मंदिर परिसरात स्थित दक्षिय भारतीय शैलीत स्थानापन असलेल्या शिव मूर्तीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी 3 वाजता चिमूर शहरातून शिव मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता शिव पार्वती विवाह हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिव विवाह प्रसंगी हनुमान चालिसा पठण प्रसारक मंडळ खडसंगी यांच्या वतीने जागर शिवभक्तीचा सुमधुर भक्तिगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. दिवसभर भाविकांची गर्दी दर्शनासाठी रांग लागली होती. रात्री महाआरतीने यात्रा महोत्सव ची समाप्ती झाली.
ज्वाला समाचार सच का सामना